शनिवार, १५ सप्टेंबर, २०१२

डॉ. आंबेडकर आणि इस्लाम

http://www.islamdarshan.org/node/1077

डॉ. आंबेडकर आणि इस्लाम


- मुहम्मद मुस्तफा

यात शंका नाही की, सहा डिसेंबर १९९२ साली बाबरी मशीदीच्या विध्वंसामुळे लोकतंत्र्याच्या मुळावर जो आघात झाला, घटना व न्यायालयाची जी अवमानना झाली त्याचे उदाहरण मिळणे कठीण आहे. ही गोष्ट खेदजनक आहे की, या देशामध्ये बहुसख्यांकांकडून मुस्लिम नागरिकाचे,त्यांच्या अधिकाराचे हनन करण्यातयेत आहे आणि त्यांच्या संस्कृतीला संपविण्यासाठी संघर्षरत आहेत. हे सर्व ब्राम्हण्य वृत्तीमुळे घडले आहे. या देशाचा इतिहास ब्राह्मण्य वृत्तीमुळे क्षुद्र लेखले. त्यांना माणसातून संपवले. त्यांचे जीवन उध्वस्त केले. ब्राम्हणी वैदिक धर्माने बहुजनांना गुलाम केले आहे. ही वृत्ती अन्यायावर आधारित आहे. मनुस्मृती, वेदस्मृती सुत्रे आणि भगवद्गीता बहुजनांवर अन्याय करतात. बहुजनांविषयी, स्त्रियांविषयी घाणेरडे लिखाण करतात. ’’विषमतेची सुरुवात जन्माच्या ठिकाणापासूनच झाली आहे’’, या मिथकामधून आपल्याला वेद निर्माणकर्त्याची विषमताप्रधान वृत्ती आणि ब्राम्हणाचा अहंकार दिसून येतो. पद्धतशीरपणे समाजाची चार विभागणी करून एकेका वर्णाचे शोषण केले. शोषण करण्यासाठी मात्र स्वतः मैदानात न उतरता बलशाली क्षत्रियाना मुर्खात काढून या नीच कार्यामध्ये सहभागी करून घेतले. (आजच्या काळात गुजरातच्या भिषण मुस्लिम हत्याकाडांत दलितांना वापरले) क्षत्रियांच्या मेंदुचे अपहरण केले. आजदेखील या परिस्थितीमध्ये फरक पड लेला नाही. मराठा, राजपूत, जार, यादव, ठाकूर, पाटील, रेड्डी या क्षत्रियांवर ब्राह्मणांचेच वर्चस्व ाहे. उदाः- अंधश्रद्धा निर्मूलन कायदा विरोधी मोर्चे काढणारे सर्वच मराठे आहेत. मराठवाडा विद्यापिठासाठी नामांतर चळवळीला मराठ्यांच्या मनामध्ये दलित-विरोधाचे विष कालवण्याचे काम ब्राह्मणानी केले. मराठ्यांना फसवले गेले होते. विवेचनामध्ये वारंवार शुद्र शब्द येतो. आधुनिक किंवा संवैधानिक भाषेमध्ये सागांयचे झाले तर यात आजच्या सर्व अनुसुचित जाती जमाती, इतर मागासवर्गीय भटके विमुक्त, आदिवासी यांचा समावेश होतो.

आता ब्राम्हण्यवादाने हिंदुत्व हे फसवे नांव धारण केले आहे. पण हिंदुत्व म्हणजे ब्राम्हण्यत्व होय. भारतामध्ये ब्राम्हण्यवादाचा बालेकिल्ला राष्टीय स्वयंक संघ आहे. राज्यघटनेविषयी संघाचे ज्येष्ठ नेते दत्तोपंत ठेंगडी म्हणतात, ’’राज्यघटनेचे स्वरूप भारतीय नाही. भारतीय संस्कृती आणि परंपरा याचे प्रतिबिंब राज्यघटनेमध्ये घडलेले नाही.’’ ब्राम्हणवाद्यांचा राज्यघटनेवर प्रचंड राग आहे. डॉ. आंबेडकरानी बहुजनांना कलम १९ नुसार लेखन-स्वातंत्र्य विचार स्वातत्र्य, व्यवसाय स्वातंत्र्य दिले आहे. राज्यघटनेमध्ये समता आहे. अशा रितीने घटनेमध्ये डॉ. आंबेडकरांनी ब्राम्हणांचे वर्चस्व नाकारले आहे. ही घटना बदलून त्यांना भारतीय भेदाभेद संस्कृतीवर आधारीत घटना आणायची आहे. ब्राम्हणवाद्यांनी हिंदुत्वाचा आव आणला आहे. जर हे खरोखरच भारतीय असते तर संपूर्ण समाजघटकाचा विचार ब्राम्हणवाद्यांनी केला असता. म्हणूनच बाबरी मशीद असो किंवा प्रतापगड आंदोलन असो, या समस्या निर्माण करण्यामागे हेच कारण आहे. राममंदीराच्या उभारणीमुळे बहुजनांचे कोणतेही प्रश्न सुटणार नाहीत हे बहुजनांनी समजून घेतले पाहिजे. समजा उद्या राममंदीर उभारलेच तर तिथला पुजारी कोणी बहुजन असणार आहे का? ब्राम्हणवाद्यांचे बहुजनांविरूद्ध डावपेच असतात.

बहुजननांना कळू नये यासाठी मुस्लीम व ख्रिश्चनांची भिती दाखवली जाते. ब्राम्हण जेंव्हा धोंक्यात येतो तेंव्हा तो बहुजनांना पुढे करतो. मुस्लीम आणि बहुजनांची भांडणे लावून तो बहुजनांचे शोषण करतो. दगंलीमध्ये बहुजनच कां मरतात, ब्राम्हण का मरत नाही याचा विचार केला पाहिजे. कारण बहुजनांची मुले दंगलीत असताना ब्राम्हणाची मुले सिलिकॅन व्हॅलीत (अमेरिकेत) असतात. ब्राम्हणवादी पद्धतशीरपणे बाबा-बूवांच्या माध्यमातून बहुजन समाजाला खच्ची करण्याचे काम करतात. बहुजन दैवी, अंधविश्वासू आणि धर्मभोळे कसे बनतील हे ब्राम्हणवादी पहात असतात.

देशातील सगळ्या गंभीर प्रश्नांचे मूळ ब्राम्हणवादात आहे, मग तो प्रश्न दहशतवादाचा असो, गरिबीचा-दारिद्र्याचा असो अथवा धार्मिक विद्वेषाचा असो. देशाच्या बाँबस्फोटात संघाच्या ब्राम्हणवाद्यांचा अतीरेकी, जातीयवादी कारवांया तपासाअंती उजेडात आल्या आहेत. ब्राम्हणी पिलावळांनी गावागावापर्यंत मजल मारली आहे. ब्राह्मणवाद्यांच्या भूमिकेमुळेच आज देशातील मुस्लीम, ख्रिश्चन, दलित, शिख आदी समाज स्वतःला असुरक्षीत समजत आहे. गुजरातमध्ये ब्राम्हणवाद्यांनी मुस्लीमांचा वंशच्छेद करण्याचा प्रयत्न, मुस्लिंमाच्या हत्या करून केला. म्हणून दंगलीमधुन, धार्मिक विद्वेषामधून ब्राम्हणांचाच फायदा होतो, कारण त्यांचे दोन्ही शत्रू मुस्लीम आणि बहुजन आपापसात लढून मरतात. ’’देशातील आतंकवादाची समस्या सोडावयाची असेल तर आधी ब्राम्हणवाद्यांना सपंवणे गरजेचे आहे.’’ इति निर्भयसिंह जाधव.

ब्राम्हणी दहशतवाद हिंदुत्वाचे कवच पांघरतो. ब्राम्हण सुरक्षित राहतो हेया दहशतवादाचे वैशिष्ट्य आहे.म्हणून डॉ. आंबेडकरांनी धम्म चळवळ सुरू केली.धर्मातरांचे महत्व डॉ. आंबेडकरानी पटविले. या विषयावर सामाजिक आणि धार्मिक दोन्ही दृष्टीने गंभीर व गहन विचार केला. अस्पृश्यता मोठे सकंट आहे. याचे स्मरण डॉ. आंबेडकरांनी वारंवार करून दिले. दलितांनी स्वच्छ अन्न खावे, चागंली कपडे वापरावीत, या कारणास्तव त्यांचा जीव घेण्यातयेईल. मुस्लिम समाज दलितांन, पददलिताना जवळ करतो त्याच्यांशी स्नेहसबंध निर्माण करतो त्यांचे अंशता देखिल प्रमाण ब्राम्हण वृत्तीत नाही. याचा अनुभव डॉ. आंबेडकरांना लोकल बोर्ड, कायदे-परिषद, व्यापार-उद्योगात प्रत्यक्ष आला.

इस्लाममध्ये समानतेची शिकवण आहे, मानवतेसाठी ही सन्माननीय गोष्ट आहे. डॉ. आंबेडकरांनी ब्राम्हणाविरूद्ध जी भूमिका माडंली हे त्यांच्या अनेक ग्रंथातून स्पष्टहोते. त्यांनी स्पष्टपणे सांगितले, ’’ब्राम्हण वर्ग दलितांची गणना पशुंच्या श्रेणीत पणकरत नाही.’’ दलितांना उद्देशून डॉ. आंबेडकर म्हणाले, ’’आपल्या बविष्यासाठी,स्वाभिमानासाठी, आई- बहिणीच्या प्रतिष्ठेसाठी धर्मातंर करा.’’ पुढे सांगितले, ’’ब्राम्हण्य सस्कृंतीत जाती-भेद कदापि नष्ट होणार नाही, विषाला मध करता येणे संभव नाही, तशीचही गोष्ट आहे.’’ तसेच सांगितले, ’’धर्मांतरण नको म्हणणार्यांनी इतिहास वाचला नाही. हिन्दू धर्म कदापि आमचा धर्म नाही. बळजबरीने पूर्वजांना या गुलामीत-दास्यत्वात जखडण्यात आले होते, तो पाशवी पंजा आमच्या (दलितांच्या) रक्ताचा घोट घेणारा होता, त्यांची क्षमता नव्हती, साधने उपलब्ध नव्हती म्हणून त्यांनी मूक्ती-मार्गाचा शोध घेतला नाही.’’ या कारणास्तव डॉ. आंबेडकरांनी दि. १३ आक्टोबर १९३५ ला धर्मांतरणाची घोषणा केली. आणि लाखोच्या संख्येने हिन्दू धर्माचा त्याग केला. दक्षिण भारतात पेरियार ई. बी. नायकर यांनी १८ मार्च १९४७ रोजी हिंदू धर्म सोडण्याचे आवाहन केले. त्यावेळी पणहजारोच्या संख्येने लोक उपस्थित होते. त्यांना ’इस्लाम’ उपयुक्त व योग्य असल्याचा निवाडा दिला.

समता प्रस्थापनेत इस्लामची विशिष्ठ भूमिका

मानव समाजात जे दलित-पददलित आहेत, दीन-दुबळे आहेत, रजंलेले-गांजलेले आहेत, शोषित आहेत, सकंटग्रस्त आहेत, जुलुमी आहेत त्यांचा कैवारी-मित्र-सखा-सोबती इस्लाम आहे. पिडीतांच्या आक्रोशाला इस्लाम सहन करत नाही. म्हणून मुस्लिमांना अल्लाहचा हा आदेश आहे की, ’’मग काय कारण आहे की, तुम्ही अल्लाहच्या मार्गात त्या असहाय (दलित कमकुवत, अशक्त, दुर्बल, छळलेले) पुरु*ष स्त्रियां आणि मुलांकरिता लढू नये ज्यांचे ते कमजोर असल्यामुळे दमन केले गेले आहे. आणि ते धांवा करित आहेत की, हे अल्लाह! आम्हाला या वस्तीतून बाहेर काढ ज्यांचे रहिवाशी अत्याचारी आहेत, आणि तुझ्याकडून एखादा वाली व सहायक निर्माण कर (कुराण ४:७५).’’ या आयतीत संकेत आहे त्या अत्याचारपिडीत दलित मुले, स्त्रिया, आणि पुरुषांकडे ज्यांनी भूतलावर त्रस्त, अपमानित व अत्याचार पिडीत जीवन जगत होते आणि ते स्थलांतरित होऊ शकत नव्हते व स्वतःला त्या अत्याचारापासून वाचवूही शकत नव्हते. हे बिचारे नाना तर्हेने छळले जात होते. ते याचना करीत असत की, कोणी येऊन त्यांना या अत्याचारापासून वाचवावे.

* इस्लाम संपूर्ण सृष्टीचा धर्म आहे. इस्लाम हा संपूर्ण मानवजातीचा धर्म आहे. कुराण म्हणतो, ’’हे मानव आपल्या अल्लाहचीच प्रार्थना करा ज्याने तुम्हाला आणि तुमच्या पूर्वीच्या लोकांना निर्माण केले. आशा आहे की अशाप्रकारे तुम्ही जगातील आणि इहलोंकातील अपयशापासून सुरक्षित रहाल. (कु २:२१).

* ’’लोकहो, आम्ही तुम्हाला एका पुरुष व एका स्त्रीपासून (एक माता-पित्यापासून) निर्माण केले आणि मग तुमचे वंश आणि राष्ट्रे बनविली जेणेकरून तुम्ही एकमेकांना ओळखावे. (कु. ४९:१३)

* ’’लोकहो आपल्या अल्लाहचे भय बाळगा ज्याने तुम्हाला एका जिवापासून निर्माण केले आणि त्याच जिवापासून त्याचे जोडपे निर्माण केले. आणि त्या दोघापासून असंख्य स्त्री व पुरुष निर्माण करून (जगभर) पसरवले. (कुराण ४:१).’’

* प्रतिनिधित्वाची जबाबदारी समस्त मानवावर सारख्या स्वरूपाची आहे.

* सर्वच मानव सारखे प्रतिष्ठित आहेत. ’’आणि अल्लाहने आदमच्या मुलांना (म्हणजे सर्व मानवांस) सन्मान दिला (कु. १७:७०).

* मानवाच्या ज्ञान व विवेकशक्तीत साम्य आहे.

* मानवास परस्पर सामाजिक संबधांची ताकीद आहे.

* मनुष्याचा वैयत्ति*क, सामाजिक, सांस्कृतिक विकास झाला पाहिजे.

* भूतलावर अत्याचाराचे निर्मूलन झाले पाहिजे.

* मानवजातीत परस्पर व्यवस्थेत स्थैय पाहिजे.

* मानवजातीत परस्पर व्यवस्थेत उपकार व सहकार्य पाहिजे.

* मानवजातीत परस्पर व्यवस्थेत ैतिक व अनैतिक ओळख दिली.

* मानवजातीत परस्पर व्यवस्थेत परिवार, वंशास सन्मान, प्रतिष्ठा.

* सदाचार्यांना प्रतिष्ठा.

* ईश्वरभय बाळगण्याचे महत्व.

* मानवजातीत उच्च-नीच, स्पृश्य-अस्पृश्य विषमतेस अजिबात काडीमात्र थारा नाही.

* वर्ण-वंश-भाषा-रंग-प्रदेश यावर भेद नको.

* एकेश्वरवादी व अनेकेश्वरवादी कदापि समान नाहीत. (सत्य हेच आहे की ईश्वर एक आहे.)

शेवटी हेच सांगावे लागेल की समता, न्याय आणि बधुंत्वाच्या केवळ गप्पा मारून समस्या सुटत नसते. ही समस्या सोडविण्यासाठी इस्लामी विचारसरणीशिवाय इतर दुसरा पर्यायच नाही.

२ टिप्पण्या:

  1. खरोखर आंबेडकर खूप महान होते, त्यांनी बहुजनांना एक उत्तम मार्ग दाखवला पण आज याच बहुजनांना याचा विसर पडला आहे. ते विसरू लागले आहेत कि ते आता पूर्णपणे हिंदू धर्मातून मुक्त असून, हिंदू धर्मातील चालीरीती, भेदाभेद य पासून मुक्त आहेत. तरीही आजही अनेक बहुजन हिंदू धर्मातील रिती परंपरा पाळताना दिसतात हे पाहून आंबेडकरांनाही दुःख होईल..

    उत्तर द्याहटवा

  2. क्या मुसलमान जाति नहीं मानते ????
    हाँ तो साथियों..... हमारे कुछ तथाकथित बुद्धिजीवियों और सेक्युलर लोगो काकहना है कि... हिन्दू धर्म में जातिवाद है और यहाँ दलित भाइयों को प्रताड़ितकिया जाता है .... सो.., उन्हें हिन्दू धर्म छोड़ के मुसलमान बन जानाचाहिए....क्योंकि मुसलमान जाति नहीं मानते हैं ........
    तो पेश-ए -खिदमत है ..... नमूना -ए-खास.....
    आप दलित भाइयों से अनुरोध है कि इसे पढ़ें.., समझें और उन तथाकथितबुद्धिजीवियों से पूछे कि वे आपको क्यों झूठ -सच बता के बरगला रहे हैं....... इसमें उनका क्या हित है....????

    क्या वो नकली नाम से यहाँ हैं और अपना उल्लू सीधा कर रहे हैं.....????
    ''मुसलमानों का चार वर्गों- शेख, सैयद, मुग़ल और पठान-में परम्परागत विभाजन इस पांत (बंगाल) में प्रायः लागू नहीं है। मुसलमान दो मुखय सामाजिक विभाग मानते हैं-१. अशरफ अथवा शरु और २. अज़लफ।
    अशरफ से तात्पर्य है 'कुलीन', और इसमें विदेशियों के वंशज तथा ऊँची जाति के अधर्मांतरित हिन्दू शामिल हैं।
    शेष अन्य मुसलमान जिनमें व्यावसायिक वर्ग और निचली जातियों के धर्मांतरित शामिल हैं, उन्हें अज़लफ अर्थात्‌ नीचा अथवा निकृष्ट व्यक्ति माना जाता है। उन्हें कमीना अथवा इतर कमीन या रासिल, जो रिजाल का भ्रष्ट रूप है, 'बेकार' कहा जाता है। कुछ स्थानों पर एक तीसरा वर्ग 'अरज़ल' भी है,जिसमें आने वाले व्यक्ति सबसे नीच समझे जाते हैं। उनके साथ कोई भी अन्य मुसलमान मिलेगा-जुलेगा नहीं और न उन्हें मस्जिद और सार्वजनिक कब्रिस्तानों में प्रवेश करने दिया जाता है।
    इन वर्गों में भी हिन्दुओं में प्रचलित जैसी सामाजिक वरीयता और जातियां हैं।
    १. 'अशरफ' अथवा उच्च वर्ग के मुसलमान (प) सैयद, (पप) शेख, (पपप) पठान, (पअ) मुगल, (अ) मलिक और (अप) मिर्ज़ा।
    २. 'अज़लफ' अथवा निम्न वर्ग के मुसलमान
    (i) खेती करने वाले शेख और अन्य वे लोग जो मूलतः हिन्दू थे, किन्तु किसीबुद्धिजीवी वर्ग से सम्बन्धित नहीं हैं और जिन्हें अशरफ समुदाय, अर्थात्‌ पिराली और ठकराई आदि में प्रवेश नहीं मिला है।
    ( ii) दर्जी, जुलाहा, फकीर और रंगरेज।
    (iii) बाढ़ी, भटियारा, चिक, चूड़ीहार, दाई, धावा, धुनिया, गड्‌डी, कलाल, कसाई,कुला, कुंजरा, लहेरी, माहीफरोश, मल्लाह, नालिया, निकारी।
    (iv) अब्दाल, बाको, बेडिया, भाट, चंबा, डफाली, धोबी, हज्जाम, मुचो, नगारची,नट, पनवाड़िया, मदारिया, तुन्तिया।
    ३. 'अरजल' अथवा निकृष्ट वर्ग
    भानार, हलालखोदर, हिजड़ा, कसंबी, लालबेगी, मोगता, मेहतर।
    (सभी उद्धरण बाबा साहेब डॉ. अम्बेडकर सम्पूर्ण वाड्‌मय, खंड १५-'पाकिस्तान और भारत के विभाजन, २००० से लिए गए हैं)
    --

    उत्तर द्याहटवा